बिडदी टाऊनशिप योजनेविरोधात सुरू असलेले आंदोलन पूर्णपणे राजकीय प्रेरित असल्याचा आरोप मोठे व मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी केला आहे. या योजनेची सुरुवात एच. डी. कुमारस्वामी यांनीच केली होती, आणि आता तेच शेतकऱ्यांना भडकवून आपले राजकीय हित साध्य करत आहेत, असा घणाघात त्यांनी केला.

विजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, २००६ मध्ये एच. डी. कुमारस्वामी यांनी ही योजना लागू केली होती. गेल्या २० वर्षांत भाजप आणि जेडीएसचे सरकार असताना ही योजना मंत्रिमंडळात रद्द का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी विचारला. ज्यांनी या योजनेला जन्म दिला तेच आता आंदोलन करत आहेत. त्या भागातील शेतकऱ्यांना भडकवून सरकारची अडचण करणे हाच त्यांचा उद्देश आहे, परंतु ही परिस्थिती हाताळण्यास मुख्यमंत्री समर्थ आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

याच वेळी बी. वाय. विजयेंद्र आणि मधू बंगारप्पा यांच्यातील संभाषणाचा उल्लेख करत, आंदोलन करणारेच भरपाई घेत असल्याचे सत्य समोर आल्याचे त्यांनी सांगितले. एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी यांच्या जमिनीबाबत बोलण्यास नकार देत, अनिता कुमारस्वामी आपल्या भगिनीसारख्या असून महिलांच्या बाबतीत आपण बोलणार नाही, असे मंत्री एम. बी. पाटील यांनी म्हटले. स्वतःच्या इच्छेने जमीन देणाऱ्यांना रोखता येत नाही, हे आगामी निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्याचे तंत्र असल्याचा टोला त्यांनी लगावला.


Recent Comments