आरएसएस आणि भाजप कण्हेरी काडसिद्धेश्वर स्वामींना पुढे करून राज्यात जातीयवाद पसरवत असून समाज विभाजनाचा कट रचत आहेत, असा आरोप विजापूर जिल्हा बसवादी शरण आणि पुरोगामी संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर कोडबागी यांनी केला.

विजापूर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कण्हेरी स्वामींनी समाजात द्वेष पसरवणे थांबवले नाही, तर आगामी काळात विजापूर जिल्ह्यात त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सर्व जाहीर कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दानपेटी चोरीच्या प्रकरणाचा उल्लेख करत, रामजन्मभूमी ट्रस्टचे व्यवस्थापन आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधी पाहत असल्याने या चोरीची संपूर्ण जबाबदारी त्यांनीच घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी ‘अहिंदा’ नेते सोमनाथ कळीमनी यांनीही आरएसएस आणि भाजपच्या धोरणांवर सडकून टीका केली. आरएसएसची नीती बसवेश्वरांनी मांडलेल्या समतावादी विचारसरणीच्या पूर्णपणे विरोधात आहे, असे ते म्हणाले.
शेतकरी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आरएसएस प्रमुख मोहन भागवत बोलत नाहीत, उलट मागासवर्गीय व दलित समाजातील तरुणांमध्ये जाती-धर्माचे विष पेरण्याचे काम करत आहेत, असा आरोपही या पत्रकार परिषदेत करण्यात आला.


Recent Comments