Dharwad

धारवाडमध्ये बकरी ईदला होणारी गोहत्या रोखण्याची मागणी

Share

धारवाडमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानीच्या नावाखाली होणारी गोहत्या काटेकोरपणे रोखावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गो रक्षक कर्नाटक उत्तर प्रांत संघटनेच्या वतीने धारवाडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारला मागण्यांचे निवेदन सादर केले. राज्यात २०२० पासून गोहत्या बंदी कायदा लागू असून, बकरी ईदच्या काळात जिल्ह्यात कुठेही गोवंश हत्या होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. हिंदू धर्मात गायीमध्ये ३३ कोटी देव मानले जात असल्याने धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि खबरदारीचा उपाय म्हणून २९ मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच जनावरांची बेकायदेशीर साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलीस, परिवहन व संबंधित विभागांचा समावेश असलेला एक विशेष टास्क फोर्स (विशेष पथक) तयार करावा आणि विविध ठिकाणी तपासणी नाके (चेक पोस्ट) उभारून गोहत्येला कडक प्रतिबंध करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या वेळी बजरंग दलाचे प्रांत सहसंयोजक शिवानंद सत्तीगेरी, जिल्हाध्यक्ष महेश पाटील, जिल्हा कार्यवाह अनुदीप कुलकर्णी, जिल्हा संयोजक सिद्धू हिरेमठ, मंजुनाथ शिग्गावी, गुरुशांत हिरेमठ, ध्रुव उप्पर आणि उदय यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: