Bagalkot

घटप्रभा कालव्यात पाणी सोडण्यासाठी लोकापूरमध्ये रस्ता रोको!

Share

पाऊस नसल्याने डोळ्यांदेखत पिके वाळत चालल्यामुळे बागलकोट जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत भीषण संकटात सापडले आहेत. घटप्रभा उजव्या कालव्यात तात्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मुधोळ तालुक्यातील लोकापूर येथील जगज्योती बसवेश्वर चौकात शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत मोठे आंदोलन छेडले आहे.

बेळगावपासून बागलकोट जिल्ह्यापर्यंत तब्बल १९९ किलोमीटर व्यापलेल्या घटप्रभा उजव्या कालव्यात पाणी नसल्याने संपूर्ण लोकापूर भागातील शेतकऱ्यांचे जीवन अंधकारमय झाले आहे. एकीकडे पावसाची दडी आणि दुसरीकडे कालव्यातही पाणी सोडले नसल्याने लाखो रुपये खर्च करून घेतलेली पिके पाण्याअभावी जळून जात आहेत, ज्यामुळे बळीराजा पूर्णपणे हवालदील झाला आहे.

यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लोकापूर शहरातील प्रमुख बसवेश्वर चौकात वाहतूक पूर्णपणे रोखून धरत ठिय्या मांडला आहे. शासन आणि जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, कालव्यात तात्काळ पाणी सोडले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.

Tags: