Chikkodi

चिक्कोडीमधील चरमुर्ती मठामध्ये लिंगायत मेळावा संपन्न

Share

केवळ घरापुरते मर्यादित असलेल्या महिलांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य बसवण्णांनी मिळवून दिले, असे प्रतिपादन चिक्कोडीमधील चरमुर्ती मठाचे संपादना स्वामीजी यांनी केले. चिक्कोडीमध्ये आयोजित लिंगायत समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

चिक्कोडी मधील चरमुर्ती मठामध्ये लिंगायत समुदायाचा मेळावा दिव्य सान्निध्यात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना मातांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासोबतच त्यांना वचनांची शिकवण द्यावी, असे संपादना स्वामीजी यांनी म्हटले. मानवाने अहंकाराचा त्याग करून दान आणि धर्माचे कार्य अंगीकारले पाहिजे आणि बसवण्णांनी दाखवलेल्या मार्गावर चालले पाहिजे, अशी प्रतिक्रिया संपादना स्वामीजी यांनी व्यक्त केली.

यानंतर निवृत्त शिक्षक चंद्रशेखर अरभावी यांनी समाजातील वाढत्या मोबाईल आणि टीव्हीच्या व्यसनावर चिंता व्यक्त केली. मुलांमधील हे व्यसन कमी करण्यासाठी त्यांना अध्यात्म, सत्संग आणि प्रवचनांच्या माध्यमातून प्रवृत्त करणे आवश्यक आहे. आपला आदर्श पाहून समाजाने शिकावे, अशा शब्दांत चंद्रशेखर अरभावी यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी प्रा. एस. वाय. हंजी, प्रकाश पायनवर, एन. जी. पाटील, सुनील खड्ड, सुभाष संकपाळ, मारुती मुंजाव, लक्ष्मीकांत घोसरावाडी, अजित हुनश्याळे, शिवयोगी चन्नगौडर, एस. एस. मठपती, शिवलीला हिप्परगी, चेन्नम्मा कोळचे, नागराज बलोबाळ, ए. आर. इसारगोंडा, एस. आर. मरडी, मंगल अंबाई, जयश्री मसरगुप्पी आणि शैला पट्टणशेट्टी यांच्यासह बसव रक्षक दलाचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: