व्यसनामुळे शरीर आणि आयुष्याचा आधार नष्ट होतो, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बी.के. आरती यांनी केले. येडूर गावातील शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती अभियानात त्या बोलत होत्या.


भारत सरकार आणि ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील १० कोटी तरुणांना व्यसनमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बिडी, तंबाखू, दारू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि मोबाईलचा अतिवापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमात बी.के. सविता यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त आयुष्याची शपथ दिली. या प्रसंगी बी.के. भाग्यश्री, मनोहर तोरसे, मुख्याध्यापिका आर.जे. कांबळे, मुख्याध्यापिका निर्मला गुरव आणि शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments