देशात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या भागांमध्ये बेळगाव अग्रेसर असून येथील हजारो शेतकरी मनुका उत्पादनात गुंतले आहेत. मात्र, वाढता उत्पादन खर्च, हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अडचणींमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत, असे कर्नाटक शेतकरी संघटना आणि ग्रीन आर्मीचे जिल्हाध्यक्ष संगमेश सगर यांनी म्हटले आहे.

मनुका निर्मितीसाठी आवश्यक सुविधा, प्रक्रिया युनिट्स आणि साठवणूक व्यवस्थेसाठी सरकारने सबसिडी दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंती संगमेश सगर यांनी केली आहे.



Recent Comments