टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेटजवळ लावण्यात आलेले बॅरिकेड्स त्वरित हटवावे, यासाठी सुभाष घोळप यांनी डीजी-आयजीपी डॉ. एम.ए. सलीम यांच्याकडे निवेदन सादर केले.

पहिल्या रेल्वे गेटजवळ लावण्यात आलेले बॅरिकेड्स हटवण्याची मागणी सुभाष घोळप मागील अनेक वर्षांपासून करत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी नुकतेच डीजी-आयजीपी डॉ. एम.ए. सलीम यांना निवेदन सादर केले. यावर, एडीजीपी यांनी पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, बेळगावमधील नागरिकांनी, चालत्या वाहनांना अडवून कागदपत्रांची तपासणी न करण्याच्या आदेशाचे स्वागत केले आहे.
निवेदन सादर करताना अजित नाईक, सुमंत धारेश्वर, मनोहर रोकडे, दीपक गवंडळकर, रमेश फाटक, श्रीकांत कदम, एम.बी. हूगार, रणजित हावळण्णाचे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.


Recent Comments