विजापूर जिल्ह्यात मतदारयादीची विशेष पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. आनंद के. यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार नवीन नावे समाविष्ट करणे, जुन्या नावांमध्ये सुधारणा करणे आणि आवश्यक असल्यास नावे वगळणे यांसारखी कामे केली जातील. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही आणि कुणीही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.

मतदारयादीच्या या पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन डॉ. आनंद के. यांनी केले आहे. मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments