विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात झालेल्या सहा जणांच्या खळबळजनक हत्याकांड प्रकरणातील सर्व १२ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.


या कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी माहिती दिली. गोविंदपूर गावातील शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांची धारदार शस्त्रास्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी चडचण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.

या गुन्ह्याप्रकरणी ईश्वरगौडा पाटील, अप्पुगौडा पाटील, ईश्वरप्पा पाटील, बसवराज मठपती, प्रशांत पाटील, सिद्धराम पाटील, लयप्पा बिरादार, अनिलकुमार कोळी, बशीर शेख, श्रीराम बिरादार, प्रकाश जावरेकर आणि अप्पण्णा भोवी या १२ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पोलिसांनी तपासचक्र फिरवून या सर्व १२ आरोपींना अटक केली असून आज त्यांना इंडी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुढील चौकशीसाठी पोलीस या आरोपींची कोठडी मागण्याची शक्यता आहे.


Recent Comments