खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड पोलीस ठाण्यामध्ये दीर्घकाळ कर्तव्य बजावून शासकीय नियमांनुसार बदली झालेल्या पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एका विशेष समारंभात भावपूर्ण निरोप देण्यात आला.

नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाचे योगदान देणारे एएसआय आरेर, एएसआय मुकाशी, हवालदार नागराज बेळवडी तसेच पोलीस शिपाई विजय पाटील आणि भजंत्री यांची बदली झाली आहे. या पार्श्वभूमीवर नंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी बोलताना निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करून त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या निरोप समारंभाला पीएसआय बळिगार, पीएसआय महानंदा, एएसआय श्रीनिवास, हवालदार नीलकंठ चंदरगी, शिवानंद तुरमुरी, चिदानंद मन्नीकेरी, एस. जी. शिंत्रे, श्रीकांत तळवार आणि सी. एस. करविनकोप्प यांच्यासह पोलीस ठाण्यातील इतर सर्व सहकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments