उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता मुद्देबिहाळ तालुक्यातील नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आमदार अप्पाजी नाडगौडा पाटील यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

तालुक्यातील कालव्यांना तातडीने पाणी सोडण्याचे कडक निर्देश त्यांनी कृष्णा जल भाग्य निगमच्या अधिकाऱ्यांना फोनवरून दिले आहेत.

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यात कालव्यांद्वारे पाणी सोडण्याबाबत आमदार अप्पाजी नाडगौडा पाटील यांनी कृष्णा जल निगमच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. उन्हाळ्यात सर्वसामान्यांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा त्रास होत असून, पुढील दोन दिवसांत चिम्मलगी उपसा सिंचन कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, अशी सूचना आमदार अप्पाजी नाडगौडा पाटील यांनी दिली.


Recent Comments