बालविवाह आणि सती प्रथेविरुद्धच केवळ लढा नव्हे, तर शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार करून उत्तर भारतात हिंदू साम्राज्याची स्थापना करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर या देशासाठी अभिमानास्पद आहेत, अशी प्रतिक्रिया सिद्धयोगी अमरेश्वर अप्पाजी कौलगुड यांनी व्यक्त केली.

बेळगाव साहित्य भवन (कुरुब) येथे हालूमत कल्याण संघातर्फे अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सिद्धयोगी अमरेश्वर अप्पाजी कौलगुड स्वामी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सिद्धयोगी अमरेश्वर अप्पाजी कौलगुड स्वामी यांचा सन्मान करण्यात आला तसेच एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सिद्धयोगी अमरेश्वर अप्पाजी कौलगुड स्वामीजी म्हणाले, ज्या काळात स्त्रिया केवळ चार भिंतींच्या आत राहण्यापुरत्या मर्यादित होत्या, अशा काळात आपल्या शहाणपणाने, शौर्याने आणि सामाजिक विचाराने राणी म्हणून राज्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर महिलांसाठी एक आदर्श आहेत. अशा शूर महाराणीची जयंती राज्य आणि केंद्र सरकारने शासकीय कार्यक्रमाद्वारे आयोजित करून त्यांचा गौरव करावा, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला शिवाजी हवाळी, चेतन अप्पुगोळ, एस.टी.पुजारी, यल्लाप्पा कुरबरा, अशोक सदलगी, अक्की सागर, गोंडे, रेखा दळवाई यांच्यासह हालूमत समाजाचे नागरिक उपस्थित होते.


Recent Comments