जंगलात अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या कडक सूचना मंत्री ईश्वर खंडरे यांनी वनाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शहरातील वनविभाग कार्यालयात त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धारवाड वनपरिमंडळांतर्गत येणाऱ्या धारवाड ,हावेरी , गदग जिल्ह्यांमध्ये अतिक्रमणाची प्रकरणे वाढली असून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व त्यांनी कोणाच्याही दबावाखाली झुकू नये असे सांगितले .
आपल्या सर्वांच्या जगण्यासाठी हिरवळीचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. धारवाड वनपरिमंडळात 30 लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट असून 10 लाख रोपांची लागवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments