प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे चुकीचे, अत्यंत खालच्या पातळीवर गेल्यासारखे आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त आज बेंगळुर येथील विधानसौधासमोरील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते बोलत होते.
शाळांना भगवा रंग देण्यास काँग्रेसने केलेल्या विरोधाबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बोम्मई म्हणाले की, भगवा रंग भारतीय ध्वजातही आहे. भगवा पाहून राग का येतो? स्वामी विवेकानंद जे भिक्षू होते त्यांच्या नावाने शाळेच्या खोल्या बांधल्या जात आहेत. त्यांनी भगव्या रंगाची वस्त्रे धारण केली. विवेक म्हणजे सर्वांसाठी ज्ञान. ते मिळवूया, असे ते म्हणाले.
यावेळी मंत्री हालप्पा आचार, मुख्य सचिव वंदिता शर्मा उपस्थित होते.


Recent Comments