बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर राष्ट्रीय महामार्ग बांधू नये, या मागणीसाठी शिंदोळी गावातील शेतकऱ्यांनी गुरुवारी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शेतजमिनीतून महामार्ग बांधण्यास शिंदोळीतील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शिंदोळी गावातील शेतकरी गरीब असून त्यांची जमीन खूपच कमी आहे. जमीन सुपीक असून त्यांची कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. या जमिनी पूर्णपणे बागायती आहेत. आम्ही या जमिनित भात, ऊस, डाळी, भाजीपाला पिकवतो. इथे गरीब, हरिजन आणि मागास शेतकऱ्यांच्या जमिनीत राष्ट्रीय महामार्ग बांधला तर शेतकरी कुटुंबे रस्त्यावर आत्महत्या करतात, अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे आमच्या गावात राष्ट्रीय महामार्ग करण्यास त्यांनी विरोध व्यक्त केला आहे.
बाबागौडा पाटील, बाबू अनगोळकर, राजू पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments