hubali

कुंदगोळमध्ये १५०० किलो अन्नभाग्य योजनेचे धान्य सांडले रस्त्यावर

Share

गरिबांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी असलेले अन्नभाग्य योजनेचे धान्य रस्त्यावर सांडून वाया गेल्याने कुंदगोळ अन्न नागरी पुरवठा विभाग वादात सापडला आहे.

अन्नभाग्य योजनेअंतर्गत रेशनचे धान्य वाहून नेणाऱ्या ट्रकवरून ५० किलो वजनाच्या तब्बल ३० पिशव्या कुंदगोळ तालुक्यातील हिरेनेर्ती ते चिक्कनेर्ती रस्त्यावर पाडल्या.

शनिवारी ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच रेशन दुकानाकडे धान्य घेऊन जाणाऱ्या या वाहनातून धान्याच्या पिशव्या रस्त्यावर पडल्याने सुमारे १५०० किलो ज्वारी मातीत मिसळून वाया गेली. या प्रकारामुळे अन्न नागरी पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात अन्न निरीक्षक बसवराज संशी यांना विचारले असता, रस्त्यावर सांडलेले धान्य ग्राहकांना दिले जाणार नसून त्यांना दुसरे धान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

परंतु रस्त्यावर सांडलेल्या १५०० किलो ज्वारीच्या नुकसानीला जबाबदार कोण आणि यावर तहसीलदार काय कारवाई करणार, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.

Tags: