शासकीय गॅरंटी योजनांचा लाभ खऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी बेळगाव जिल्ह्याभरात घरगुती सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. बेळगाव येथील रामतीर्थ नगर परिसरात सर्वेक्षणाचा शुभारंभ करताना जिल्हा गॅरंटी योजनेचे अध्यक्ष विनय नवलगट्टी यांनी ही माहिती दिली.


राज्य सरकारच्या गॅरंटी योजना प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत योग्य रीतीने पोहोचल्या पाहिजेत, या मुख्यमंत्र्यांच्या इच्छेनुसार बेळगावमध्ये संबंधित विभागाचे अधिकारी आणि हेस्कॉम कर्मचाऱ्यांसह हे घरगुती सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे, असे विनय नवलगट्टी यांनी सांगितले. काही योजनांमध्ये पात्र लाभार्थी सुविधेपासून वंचित राहिल्याची शक्यता लक्षात घेऊन, खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी विशेष अर्जाद्वारे ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने माहिती गोळा केली जात आहे.

शहर परिसरातील रामतीर्थ नगर येथे पार पडलेल्या या सर्वेक्षण मोहिमेत हेस्कॉमचे मुख्य अभियंता प्रवीणकुमार चिकडे, कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments