
बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज कोसळल्याने जनावरांचा मृत्यू झाला असून शेकडो एकरवरील पिके भुईसपाट झाली आहेत.


मुधोळ तालुक्यामध्ये वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने थैमान घातले आहे. रंजणगी गावात वीज पडल्याने दोन म्हशी आणि एका शेळीचा मृत्यू झाला असून एक निवासी घर पूर्णपणे कोसळले आहे. तसेच माचकनूर गावात काढणीला आलेली १५ एकरपेक्षा जास्त केळीची बाग भुईसपाट झाली असून लोकापूर भागात डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुधोळ शहरात वादळामुळे ३० पेक्षा जास्त घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागल्याने शेतकरी हवालदिल झाला असून महसूल अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन संयुक्त पाहणी व पंचनामे सुरू केले आहेत.




Recent Comments