बी. वाय. विजयेंद्र हेच पुढील कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून कायम राहतील, असा विश्वास माजी आमदार ए.एस. पाटील नडहळ्ळी यांनी व्यक्त केला आहे.

राज्य भाजप अध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांना बदलण्याची मागणी करून भाजपच्या बंडखोर नेत्यांची एक टीम लॉबिंग करत आहे. अशा परिस्थितीत, भाजपचे प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष आणि माजी आमदार ए.एस. पाटील नडहळ्ळी यांनी विजापूर येथे माध्यमांशी बोलताना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट केले.
“बी.वाय. विजयेंद्र हे पुढील तीन वर्षांसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम राहतील. त्यांनी यापूर्वीच राज्य सरकारविरुद्ध अनेक यशस्वी आंदोलने केली आहेत. कोणत्याही कारणामुळे त्यांना अध्यक्षपदावरून बदलणे शक्य नाही.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.


Recent Comments