विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नागबेनाळ गावात लांडग्यांच्या हल्ल्यात मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे सिद्धप्पा सुलतानपूर आणि मल्लप्पा पुट्टी या शेतकऱ्यांच्या मेंढ्या बळी पडल्या असून, दोन्ही कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

या घटनेची माहिती मिळताच राज्य भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष ए.एस. पाटील नडहळ्ळी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन शेतकरी कुटुंबाचे सांत्वन केले. संबंधित विभागाने आणि सरकारने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments