विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कनमडी येथील शेतकऱ्यांनी राज्याचे मंत्री एम. बी. पाटील यांची भेट घेऊन आपल्या शेतात पिकलेली द्राक्षे भेट दिली. एकेकाळी कोरड्या असलेल्या जमिनीवर आज सिंचनामुळे द्राक्षांच्या बागा डोलू लागल्याने शेतकऱ्यांनी मंत्र्यांचे आभार मानले आहेत.


विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कनमडी गावचे शेतकरी निंगू बिरादार यांनी जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांची भेट घेऊन त्यांना द्राक्षे दिली. एम. बी. पाटील जलसंपदा मंत्री असताना त्यांनी या मतदारसंघाला सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळेच आज या दुष्काळी भागात द्राक्षाचे पीक घेऊन प्रगती साधणे शक्य झाले, अशी भावना निंगू बिरादार यांनी व्यक्त केली.

पाणी मिळाल्यामुळे आमच्या जमिनीला नवे जीवन मिळाले असून, आज आम्ही द्राक्षाचे दर्जेदार उत्पन्न घेत आहोत, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी सचित एम. बी. पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


Recent Comments