म्हादई योजनेच्या अंमलबजावणीसाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. केंद्र सरकारकडून संमती मिळताच प्रकल्पाचे काम सुरु करणार आहोत. त्यामुळे निवडणुकीवर कोणीही बहिष्कार टाकू नये, अशी विनंती कामगार मंत्री संतोष लाड यांनी केली.
धारवाडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री संतोष लाड यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा केली आहे. केंद्राकडून पर्यावरणीय मंजुरी मिळताच काम सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार टाकू नये, असे आवाहन त्यांनी म्हादई आंदोलकांना केले.


Recent Comments