Banglore

हमी योजना कोणत्याही कारणास्तव बंद केल्या जाणार नाहीत : सिद्धरामय्या

Share

राज्य सरकारने राबवलेल्या पाच हमी योजना गरीबांसाठीचे कार्यक्रम आहेत आणि त्या कोणत्याही कारणास्तव थांबवल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

बेंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, ‘काँग्रेसने लोकसभा निवडणूक जिंकली नाही तर हमी योजना रद्द केल्या जातील’ या मागडीचे आमदार बालकृष्ण यांच्या विधानाला उत्तर दिले. ते म्हणाले की हमी योजना गरीब लोकांसाठीचे कल्याणकारी कार्यक्रम आहेत आणि त्या निश्चितपणे चालू ठेवल्या जातील.

केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असून त्यावर मी उद्या भाष्य करेन. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा प्रभारी सचिवांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, सरकार सत्तेवर येऊन 8 महिने झाले असून, या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात या अधिकाऱ्यांचे सल्ले व सूचना प्राप्त झाल्या आहेत.

दुकानांसमोरील नामफलकावर कन्नड भाषेचा ६०% जागेत वापर अनिवार्य करण्यासाठी काढलेला अध्यादेश राज्यपालांनी मागे घेतल्यावर प्रतिक्रिया देताना, कन्नडच्या अनिवार्य वापराच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी तो माननीय राज्यपालांना पाठवण्यात आला. परंतु राज्यपालांनी मंजुरी देण्यापूर्वीच अधिवेशन सुरू झाल्याने अध्यादेश परत पाठवण्यात आला. हे विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: