Udupi

काँग्रेस पक्ष पक्ष सदैव गरिबांच्या बाजूने : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

काँग्रेस पक्ष सदैव गरिबांच्या बाजूने असून, निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या पाच हमी योजनांची अंमलबजावणी करून काँग्रेस पक्षाने वचनबद्धता सिद्ध केल्याचे महिला व बालविकास, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे सक्षमीकरण खात्याच्या आणि उडुपी जिल्ह्याच्या पालक मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ब्रह्मावर तालुका प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी झालेल्या हक्कपत्र वितरण समारंभात बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या आमचे सरकार गरीबाभिमुख असून शेतकर्‍यांची खूप काळजी आहे. ते म्हणाले की, सत्तेत आल्यानंतर सात महिन्यांत जाहीर केलेल्या पाचही हमीची अंमलबजावणी झाली, ही आमच्या सरकारची शान आहे.

देशात कसेल त्याला शेतजमीनची मालकी हा कायदा लागू करून काँग्रेसने धाडसी निर्णय घेतला आहे, हा आमच्या पक्षाचा अभिमान आहे. परवान्यासाठी 600 हून अधिक अर्ज आले होते, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 55 जणांना परवाना देण्यात आला. ज्यांना हे अधिकार मिळाले आहेत त्यांनी ई-स्वाती अंतर्गत खाते उघडावे, असा सल्ला मंत्र्यांनी लाभार्थ्यांना दिला.

या समारंभात उडपीचे आमदार यशपाल सुवर्णा, कुंदापूरचे आमदार किरणकुमार कोडगी, विधान परिषद सदस्य मंजुनाथ भंडारी, जिल्हाधिकारी डॉ.विद्याकुमारी यांच्यासह अन्य अधिकारी व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


दरम्यान, उडुपी जिल्ह्यातील प्रलंबित हक्कपत्र वाटपाची समस्या लवकरच सोडवली जाईल असे आश्वासन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कुंदापूर तालुका पंचायत सभागृहात बुधवारी झालेल्या हक्‍क वाटप कार्यक्रमात दिले. कुंदापूर तालुक्‍यातील हजाराहून अधिक लोकांना हक्कपत्रे मिळालेली नाहीत. पुढील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी समस्या सोडविण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार किरणकुमार कोडगी, भायंदूरचे आमदार गुरुराज गंटीहोळे, विधान परिषद सदस्य मंजुनाथ भंडारी, जिल्हाधिकारी विद्याकुमारी आदी उपस्थित होते.

Tags: