हिंदू धर्मात मुलाचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी किंवा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी वर्णमाला लिहिण्याची प्रथा आहे.

ही पूर्वापार चालत आलेली परंपरा असून शुभ दिवशी साक्षरतेचे शिक्षण घेतलेले मूल सुशिक्षित होऊन चांगले संस्कार घडवेल असा विश्वास आहे. असाच एक कार्यक्रम विजयपुर शहरात पार पडला.
होय, विजयपूर शहरातील जोरपुर पेठ येथे अंबाभवानी मंदिरात नवरात्रीचा एक भाग म्हणून आयोजित अक्षराभ्यास कार्यक्रमात शेकडो पालकांनी जगन्माता अंबाभवानीच्या उपस्थितीत आपल्या मुलांना अक्षराभ्यास शिकवला .
विजयपूर शहरातील भाविकांसाठी ती माता असल्याने नवरात्रीच्या दिवसांत लोक रोजच्या उत्सवाच्या ठिकाणी जमतात. येथील नवरात्रीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यारंभ. लहान मुलांनी जगन्मातेसमोर शिक्षण सुरू केल्यास मुलांचे भविष्य उज्वल होईल, असा विश्वास आहे. देवाच्या सान्निध्यात मुलानी तांदळात सरस्वती मातेचे नाव कोरले .
सकाळपासून संध्याकाळपर्यंत झालेल्या या कार्यक्रमात मुलांना तांदळाच्या ताटात ओम बीजाक्षर, सरस्वती, गणेश, शक्तीमाता आणि कुलदेवाची नावे लिहिण्यास शिकवण्यात आले. नंतर पाटीवर , आपल्या मुलांचा हात धरून , त्यांच्या मातांनी , पाटीवर कन्नड शब्द गिरवले . लहान मुले यात रममाण झाली. साक्षरतेच्या सरावासाठी सरस्वती आणि जगन्माता पारायणाचे पठण केले.
आपल्या मुलाचा पुढील अभ्यास चांगला होऊन मुलाचे शिक्षणात भविष्य उज्ज्वल होवो, अशी प्रार्थना त्यांनी जगन्मातेला केली.


Recent Comments