धारवाड तालुक्यातील कळकेरी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मोठा अजगर दिसल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या सर्पमित्र यल्लाप्पा यांनी अजगराला पकडून जंगलात सोडून दिले, आणि शेतकऱ्यांना भयमुक्त केले .
शेतात मोठा अजगर दिसून आल्याने शेतकरी शेतीची कामे करण्यास व पाळीव जनावरे शेतात आणण्यास घाबरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी सर्पमित्र यल्लाप्पाला माहिती देऊन त्यांच्याकरवी त्या अजगराला पकडले आणि सुरक्षित जंगलात सोडून दिले .


Recent Comments