कामे न करता बिले देणे ही काँग्रेसची पद्धत आहे, असा पलटवार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसवर केला आहे.
कोप्पळ येथे प्रसार माध्यमांशी बोलताना, आणेगुंदीतील विकासकामांसाठी 125 कोटी रुपये मंजूर झाले असून ते अद्याप सोडण्यात आलेले नाहीत, या विरोधी पक्षाच्या वक्तव्याला मुख्यमंत्री बोम्मई यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कामे कशी होतील, याचा विचार व्हायला हवा. शासन आदेशानुसार निविदा मंजूर करण्यात आली आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर बिले देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यकांच्या ऑडिओवर भाष्य केले जाणार नाही. ज्यांनी निवेदन दिले तेच त्याला जबाबदार आहेत, असे ते म्हणाले.
मंत्री व्ही. सोमन्ना यांनी, डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे मित्र आहेत, त्यांनी त्यांच्यासोबत काम केले आहे असे सांगितले आहे. सोमन्ना अन आमचे ३५ वर्षांचे नाते आहे. तेच सत्य आहे, असे ते म्हणाले.
एकंदर, निधी मंजूर करूनही तो न दिल्याच्या काँग्रेस नेत्यांच्या आरोपावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.


Recent Comments