खानापूर तालुक्यातील ईदलहोंड गावात वीट कामगाराच्या झोपडीला अचानक आग लागली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ईदलहोंड येथील शेतकरी संजय चांगाप्पा जाधव यांच्या शेतात वीट कामगार राहत होते. हे लोक वीटभट्टीवर काम करीत होते . त्यांच्या झोपडीला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे . अन्नधान्यासहित सर्व साहित्य या आगीत जळून खाक झाले आहे .त्यांना शासनाकडून योग्य मोबदला मिळावा अशी मागणी होत आहे.


Recent Comments