क्षुल्लक कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून एका युवकावर दगडाने हल्ला करणाऱ्यांना अटक करून त्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी निवेदन जखमी युवकांच्या कुटुंबीयांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ . एम एस बोरलिंगय्या यांच्याकडे निवेदनद्वारे केली .
यासंबंधी हकीकत अशी कि , बेळगाव शहरातील , भाग्यनगर परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली होती . क्षुल्लक कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तसेच दगडाने हल्ला करून आशिष बाबाजी शेणवी नामक युवकाला जखमी करण्यात आले होते . या आरोपावरून , टिळकवाडी पोलिसांनी अनगोळ येथील दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले . मात्र या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही .

त्यामुळे आज जखमी आशिष शेणवी यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस आयुक्त डॉ . एस एम बोरलिंगय्या यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली . (फ्लो )
यानंतर माध्यमांना माहिती देताना जखमीच्या नातेवाईक गीता दळवी यांनी सांगितले कि , आमचा मुलगा दुबईत नोकरी करतो . आठ दिवसांपूर्वी तो सुटीवर गावी आला आहे . मंगळवारी रात्री जेवण करून तो आईस्क्रीम खाण्यासाठी गेला होता . त्यावेळी एक दुचाकी भरधाव आली पण थोडक्यात अपघात टळला . त्या दुचाकीवरील मुलांना याचा जाब विचारल्याने त्यांनी आमच्या मुलाला जबर मारहाण केली . आमच्या मुलावर उपचार सुरु आहेत . या प्रकरणातील सर्व आरोपीना पकडून त्यांना शिक्षा करावी जेणेकरून आम्हाला न्याय मिळाले आणि दादागिरी करणाऱ्या अन्य तरुणांना वचक बसेल .
जखमी आशिष याच्या आईने सांगितले कि , या प्रकरणात फक्त दोघांना अटक करण्यात आली आहे . अजून दोघांना पोलिसांनी अटक केलेली नाही . पोलीस देखील ही मारहाण नसल्याचे सांगत आहेत . या प्रकरणाचा नीट तपास करून उर्वरित दोघा आरोपीना देखील लवकरात लवकर अटक करावी आणि ह्या सर्व आरोपीना कडक शिक्षा करावी अशी मागणी केली . (बाईट )
यावेळी शेणवी कुटुंबियांसह त्याचे नातेवाईक आणि हितचिंतक उपस्थित होते .


Recent Comments