उसाला 5500 रुपये प्रति टन भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेळगाव येथील साखर आयुक्त कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले. यावेळी साखर आयुक्तालयाला शेण फासण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली.
होय, बेळगावच्या गणेशपुर येथील एस.निजलिंगप्पा साखर आयुक्त कार्यालयात आलेल्या कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेनेच्या नेते आणि शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना टाळे ठोकण्यापासून रोखले. त्यानंतर आयुक्त कार्यालयाच्या दाराला हिरवा टॉवेल बांधून शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांचा साखर आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी वाद झाला.

सरकार, मुख्यमंत्री बोम्मई आणि साखर मंत्री यांच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी साखर आयुक्त कार्यालयाच्या नावाच्या पाटी आणि फलक शेणाने रंगवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी वेळीच आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिस आणि शेतकरी यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयावर चिखलफेक करून संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शेतकरी नेते चुनप्पा पुजारी यांच्यासह दहाहून अधिक शेतकऱ्यांना कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले.
तत्पूर्वी आंदोलकांना संबोधित करताना शेतकरी नेते चुनप्पा पुजारी म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील अनेक भागात शेतकरी ऊसदर वाढीसाठी संघर्ष करत आहेत. मात्र आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी उसाचा भाव जाहीर केलेला नाही. साखर मंत्री याबाबत उलटसुलट उत्तर देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब जागे होऊन उसाला प्रतिटन 5500 रुपये भाव जाहीर करण्याची मागणी केली.
सातत्याने संघर्ष करूनही कारखानदारांच्या हातचे बाहुले बनलेले राज्य सरकार शेतकऱ्यांना फसवत आहे. आम्हाला गोड बातमी देतो म्हणून सांगत फसवत आहे. बागलकोट जळत आहे. बेळगावात आम्ही शांततेने लढत आहोत. मात्र, सरकारने उसाचा भाव जाहीर न केल्यास तीव्र संघर्ष करावा लागेल. तुमचे सरकारही टिकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बाइट
एकंदर ऊस दरावरून सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांचा संघर्ष काय रूप धारण करतो हे पाहणे बाकी आहे.


Recent Comments