मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे राज्यातील सुशासन न समजणाऱ्या काँग्रेसने मुख्यमंत्री बदलण्याचा मुद्दा उठवणे चुकीचे व अप्रस्तुत आहे असे जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.
बेळगावात बुधवारी पत्रकारांशी बोलताना जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले की, काँग्रेस नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सुशासन आणि विकासकामांवर भर देत आहेत. कार्यक्षमतेने आणि दर्जेदारपणे काम करत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही, आणि खोटे बोलणे ही तर काँग्रेसची प्रवृत्तीच आहे, असेही कारजोळ म्हणाले.
याच वेळी, सरकारवर 40% कमिशनच्या आरोपाबद्दल कारजोळ म्हणाले, जर असे प्रकरण असेल तर पुरावे, रेकॉर्ड द्या. आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. यापूर्वी त्यांच्या काळात झालेल्या आरोपांवर काँग्रेस सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. काँग्रेस मोदींबद्दल हलकेच बोलत आहे. देशात स्वातंत्र्यानंतर आजवर मोदींशिवाय कोणताही देशभक्त पंतप्रधान यापूर्वी झालेला नाही. काँग्रेसने जीनांशी हातमिळवणी केली. काँग्रेसनेच देशाचे तुकडे केले, असे ते म्हणाले.
यावेळी, त्यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर हल्ला केला आणि म्हटले की जर सिद्धरामय्या यांना देशाची काळजी असती तर देशाचे तुकडे झाले नसते. आपण अहिंदचा (अल्पसंख्यांक, मागास, दलितांचा) नेता असल्याचे ते वारंवार सांगत आहेत. वास्तविक नरेंद्र मोदीच अहिंद नेते आहेत. सिद्धरामय्या यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. पण सिद्धरामय्या हे जनता परिवारातून आलेले आहेत. भाजपचा मुख्यमंत्री येणार असल्याच्या सिद्धरामय्या यांच्या आरोपात तथ्य नाही. पक्षाने आपल्या इच्छेने बोम्मई यांना मुख्यमंत्री केले आहे. त्यांना बदलणे शक्य नाही. मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा अप्रासंगिक आहे असे कारजोळ यांनी सांगितले.
दरम्यान, कारजोळ यांनी, सिद्धरामय्या कधी केशवकृपामध्ये गेले का, असा प्रश्न करून, देशातील प्रत्येक नागरिकाने त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज लावला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. देशात काँग्रेस संपली आहे. स्वातंत्र्यानंतर 60 वर्षे देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसचे देशासाठी योगदानच काय, असा सवाल त्यांनी यावेळी केला.


Recent Comments