आमदार आसिफ सेठ यांनी रामतीर्थ नगर येथील ‘कर्नाटक पब्लिक स्कूल’मधील एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निवड झालेल्या शाळेतील ९ विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार केला.



यावेळी बोलताना त्यांनी शाळेतील डिजिटल शिक्षणाच्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन करत प्रोत्साहन दिले. वर्गांची सुधारणा करणे, शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण देणे हे आपल्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासन असून त्यानुसारच आपण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.



गेल्या तीन वर्षांपासून एआरएस फाउंडेशनच्या माध्यमातून ९० ते ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असून, हा उपक्रम पुढेही सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नेते उपस्थित होते.



Recent Comments