Belagavi

बेळगाव महानगरपालिकेला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाटाळ नागराज यांना अटक

Share

बेळगाव महानगरपालिकेत सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करण्याच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी वाटाळ नागराज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष झाला.

बेळगाव महानगरपालिकेत सीमाप्रश्नावर ठराव मंजूर करावा या मागणीसाठी वाटाळ नागराज यांची महापालिकेला घेराव घालण्याची योजना होती. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्ते घोषणाबाजी करत सहभागी झाले होते. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा आरटीओ जवळील संगोळी रायण्णा चौकात अडवला.
मोर्चा संगोळी रायण्णा चौकात पोहोचताच पोलीस आणि आंदोलक यांच्यात तीव्र वाद झाला. या वेळी काही महिला आंदोलकांनी थेट रस्त्यावर झोपून संताप व्यक्त केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

या कारवाईनंतर पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप वाटाळ नागराज यांनी केला आहे. शांततापूर्ण मार्गाने चाललेला मोर्चा पोलिसांनी विनाकारण रोखून कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा दावा त्यांनी केला. हा हुकूमशाही प्रकार असून मुख्यमंत्र्यांनी या घटनेची चौकशी करावी, असे वाटाळ नागराज यांनी म्हटले आहे.

Tags: