बेळवट्टी गावातील शेतकरी रवींद्र कांबळे यांचा शेतात काम करत असताना सर्पदंशाने मृत्यू झाल्याने, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी (आज) त्यांच्या घरी भेट दिली.

यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि लक्ष्मीताई फाऊंडेशनतर्फे आर्थिक मदत केली. तसेच, शासनाकडून २ लाख रुपयांची मदत देण्याचे आणि मृत रवींद्र यांच्या पत्नीला योग्य नोकरी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.


Recent Comments