शेतीकाम करत असताना बोअरवेलच्या विद्युत तारेचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धारवाड तालुक्यातील केलगेरी गावात घडली आहे.

केलगेरी गावातील निंगप्पा खजगुन्नट्टी (५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात काम करत असताना त्यांना बोअरवेलच्या विद्युत तारेचा धक्का लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धारवाड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
Recent Comments