Uncategorized

धारवाड आणि नरगुंद शेतकरी सत्याग्रहाला ४६ वर्षे पूर्ण

Share

धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद आणि गदग जिल्ह्यातील नरगुंद येथील ऐतिहासिक शेतकरी सत्याग्रहाला ४६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नवलगुंद येथे शेतकरी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला.

या प्रसंगी विविध लोकप्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांनी हुतात्मा बसप्पा शिवप्पा लक्कुंडी यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. नवलगुंद येथील शेतकरी भवनाजवळ आयोजित कार्यक्रमात आमदार एन. एच. कोनरेड्डी आणि आमदार सी. पी. योगेश्वर यांनी हुतात्मा स्मारकाचे पूजन केले.

या वेळी बोलताना आमदार सी. पी. योगेश्वर यांनी, आमदार एन. एच. कोनरेड्डी यांना राज्य सरकारमध्ये कृषी खात्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी केली.

यावर प्रतिक्रिया देताना आमदार कोनरेड्डी यांनी, आपण यापूर्वीच पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली असून कृषी खात्याची जबाबदारी मिळाल्यास अधिक प्रभावीपणे काम करू, असे स्पष्ट केले.

यावेळी शेतकरी नेते, मान्यवर, अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: