बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलखान्यात नेण्यासाठी जमा केलेल्या गायींची गोरक्षकांनी सुटका केल्याची घटना बेळगावात घडली आहे.

बकरी ईदमुळे गायींना कत्तलखान्यात नेण्यासाठी एकत्र केले जात असल्याची माहिती मिळताच, गोरक्षक मारुती सुतार यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या इतर कार्यकर्त्यांसह गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत नेले. देशात गोतस्करी आणि गोहत्त्येवर बंदी घालावी, अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे.



Recent Comments