Belagavi

प्यास फाउंडेशनकडून १५० वर्षे जुन्या विहिरीचे होणार पुनरुज्जीवन

Share

बेळगावमधील टीचर्स कॉलनी परिसरातील तब्बल १५० वर्षांपूर्वी बांधलेली ब्रिटिशकालीन ऐतिहासिक विहीर प्यास फाउंडेशनने पुनरुज्जीवित करून बेळगावमहानगरपालिकेला औपचारिकरित्या हस्तांतरित केली.

ब्रिटिश राजवटीत टिळकवाडी, शहापूर आणि खासबाग परिसरांना पाणीपुरवठा करणारी ही विहीर कालांतराने दुर्लक्षित झाली होती. तिचे पुनरुज्जीवन करण्याचे काम एकेपी फेरोकास्ट्स आणि बेम्को हायड्रॉलिक्स यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत प्यास फाउंडेशनने हाती घेतले. सुमारे ३० फूट खोल असलेल्या या विहिरीमध्ये दररोज १००० टँकर पाणी देण्याची क्षमता आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पुनरुज्जीवित विहीर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांच्याकडे औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आली.

या प्रसंगी राम भंडारे, पराग भंडारे, अनुरुद्ध मोहिते, डॉ. माधव प्रभू, अभिमन्यू डागा, प्रीती कोरे, सूर्यकांत हिंदळगेकर, अवधूत समंत, दीपक ओवळकर, सतीश लाड, रोहन कुलकर्णी, लक्ष्मीकांत पासारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: