Belagavi

जम्मू काश्मीर हल्ल्याच्या संदर्भात केंद्र सरकारला एकमताने समर्थन :के.एच. मुनीप्पा

Share

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात केंद्रीय सरकार जो निर्णय घेईल, त्याला सर्वांनी एकसंघ होऊन समर्थन देण्याचे सांगत, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री के.एच. मुनीप्पा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सोमवारी बेळगावमधील अतिथी गृहात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला एकमताने पाठिंबा दिला असून देश सर्वोच्च स्थानी या भावनेतून निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आम्ही वचनबद्ध आहोत.

पाकिस्तानने जो पोकळ प्रचार सुरु केला आहे, तो अत्यंत निषेधार्ह आहे. देशात अशा घटनांमुळे कोणीही दुखावले जाऊ नये. यावरून केंद्र सरकारने कठोर निर्णय घेऊन दहशतवाद्यांवर कारवाई करावी, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या दरवाढीच्या धोरणामुळे जनतेला मोठा फटका बसला आहे. या दरवाढी मागचे कारण काय हे जनतेसमोर आले पाहिजे. जनतेच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारने दरवाढ मागे घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना रेशन देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. ज्या भागात तांदूळ जास्त वापरला जात नाही, तिथे तीन किलो ज्वारी देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे.

ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने बऱ्याच योजना तयार केल्या आहेत, ज्यामुळे गरीबांना उपासमारीचा सामना करावा लागणार नाही, गरीबांना धान्य पुरवठा आणि मनरेगा योजनेतून रोजगार देणे, हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

Tags: