Belagavi

वृक्षारोपण तेव्हाच पूर्ण होते जेव्हा लावलेले रोपटे वृक्ष होईपर्यत जपले जाते – शशी आनंदजी

Share

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या बेळगाव शाखेतर्फे वन नेस वन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, बेळगावच्या वतीने रविवारी वन नेस वन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण करण्यासाठी शाखा समन्वयक शशी आनंदजी, ज्ञान प्रवर्तक वैजनाथ ल्हासे, राजू नागवडेकर, तुषार लेंका, गजानन गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समन्वयक शशी आनंदजी व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मानवाला ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्यांना हरित संपत्तीची गरज आहे. तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या म्हणाल्या की, वृक्ष लागवड तेव्हाच पूर्ण होते जेव्हा रोपटे लावले जातात आणि रोपट्यांना पाणी देऊन झाडे वाढविली जातात आणि त्यांचे जतन केले जाते.

यावेळी संत निरंकारी सेवा दलाचे बंधू-भगिनी सहभागी झाले होते.

Tags: