शेतकरी दुष्काळाने होरपळत असतानाच बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील उदपुडी येथील शिवसागर साखर कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळावर अन्नदात्यांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. यासंबंधी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व समस्या सोडविण्याचे काम करू, असे आश्वासन शेतकरी आणि भागधारकांना दिले आहे .
अलीकडच्या काळात उदपुडी गावातील शिवसागर साखर कारखाना अरिहंत इंडस्ट्रीज भाडेतत्त्वावर चालवत होता. मात्र आता शिवसागर साखर कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने ज्या भागधारक, कामगार व शेतकऱ्यांची ऊस बिलाची थकबाकी ठेवली आहे, त्यांची माहिती न देताच लिलाव केला आहे. NCLTD ने कारखान्याचा लिलाव जगदीश गुडगुंटी शुगर्स लिमिटेडला केला आहे. कारखान्याचे भागधारक आणि कामगार अस्वस्थ आहेत.
कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी 75 हजार भागधारकांचे सुमारे 37 कोटी रुपये परत करावेत, तसेच 300 हून अधिक कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी केली आहे. काल संध्याकाळी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रामदुर्गचे काँग्रेस आमदार अशोक पट्टन, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि एसपी भीमा शंकर गुळेद यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शेतकरी आणि भागधारकांनी समस्या मांडल्या. ऊस बिलाची थकबाकी असलेले शेतकरी न्यायालयात जाऊन याचिका दाखल करू शकत नाहीत.
बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व समस्या सोडविण्याचे काम करू, असे आश्वासन दिले.


Recent Comments