Chikkodi

पैशांच्या जोरावर काँग्रेसची निवडणूक : राधामोहन अगरवाल

Share

काँग्रेस पक्ष पैशाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहे असा आरोप भाजप राज्य प्रभारी राधा मोहन अगरवाल यांनी केला आहे.

राज्यातील १८ लोकसभा मतदार संघात भाजपचा विजय निश्चित असून कर्नाटकातील जनतेला भिक्षेच्या स्वरूपात हमी योजना मिळत असल्याची टीका राधा मोहन अगरवाल यांनी केली. जगदीश शेट्टर यांना बेळगावमधून विजयी करण्यासाठी रमेश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी यांना जबाबदारी देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

Tags: