Belagavi

शिक्षकांच्या भारत यात्रेचे 20 रोजी बेळगावात आगमन : रमेश गोणी

Share

शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आलेल्या भारत यात्रेचे 20 रोजी बेळगावात आगमन होणार आहे. त्यानिमित्त कित्तूर चन्नम्मा सर्कल ते केपीटीसीएल हॉलपर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार असून त्यात 5 हजार शिक्षक व कर्मचारी सहभागी होणार आहेत.

कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे सरचिटणीस रमेश गोनी यांनी आज बेळगावात पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सांगितले की, भारत यात्रेचे 20 तारखेला बेळगावात आगमन होणार आहे. कन्याकुमारी येथून निघालेली ही रॅली संपूर्ण केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा प्रवास करून कर्नाटकात येत आहे. एनपीएस रद्द करून ओपीएसए लागू करण्यात यावे, या मागणीसाठी भारतातील चार विभागातून ही यात्रा सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

या भारत यात्रेत बेळगाव जिल्हा 7 मधील सर्व शिक्षक व कर्मचारी सहभागी होणार असल्याचे राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेब्बळळी यांनी सांगितले. या लढ्याला शिक्षकांसोबतच हेस्कॉम कर्मचारी, एनपीएस कर्मचारी संघटना व हायस्कूल असोसिएशन या सर्वांनी पाठिंबा दिला आहे.

या पत्रकार परिषदेला राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष यल्लप्पा पुजार, सहसचिव के. एस. राचन्नावर, शहराध्यक्ष बी. बी. सोगलन्नवर, ए. एस. दोड्डबसन्नवर, जिल्हा पदाधिकारी राजू कोलकार, आर. व्ही. हैबती, प्रकाश दयेन्नवर, डी. आर. नरसन्नावर, लिंकनट्टी, करेनवर आदी उपस्थित होते.

Tags: