अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला असता तर आतापर्यंत शेतजमीन हिरवीगार झाली असती. तलाव आणि विहिरी पाण्याने भरलाय असत्या . मात्र, यावर्षी पावसाने दडी मारल्याने तलाव कोरडे पडले आहेत. जलाशयातील पाण्याची पातळी लक्षणीय घटली आहे.
कोरड्या तलावांचे आता मुलांच्या खेळाच्या मैदानात रूपांतर झाले आहे. दुसरीकडे जनावरे पाण्यासाठी वणवण करत आहेत.
नवलगुंद तालुक्यातील शिररू गावातील तलावात पाण्याचा थेंबही नाही. मुलांनी कोरड्या तलावाचे क्रीडांगणात रूपांतर केले आहे. लहान मुले तलावात खेळताना दिसली. दुसरीकडे तलाव आणि तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेली माकडे तलावाच्या काठावर बसून लहान मुलांना खेळताना पाहत होती.
Recent Comments