महाराष्ट्रातील राजापूर बॅरेजमधून कृष्णा नदीत 1,400 क्युसेक पाणी सोडण्यात आले असून ते चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ , येडूर , मांजरी आणि इंगळी गावातून नदीत पाणी वहात आहे .
राजापूर बॅरेजमध्ये पावसाचे पाणी साचलेले नाही. बॅरेजचे दरवाजे उघडून केवळ परतीचे पाणी सोडण्यात येत असल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले. याचा फायदा अथणी तालुक्यातील जुगुळ , मंगावती चंदूर , चंदूरटेक, येडूर , कल्लोळ, अंकली, मांजरी गावातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना होणार आहे.
तालुक्यातील पूर्णपणे कोरडी पडलेल्या कृष्णा नदीत काही प्रमाणात पाणी वाहत असल्याने शेतकरीही सुखावला आहे. निदान गुरांचा तरी पाण्याचा प्रश्न तरी थांबेल. महाराष्ट्र सरकारने आणखी पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
Recent Comments