राजकारणात माणसाची दूरदृष्टी आणि संयम खूप महत्त्वाचा असतो, मी निराश नाही, अच्छे दिन येणार आहेत असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केलाय.

मंत्रिपद गमावल्यानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देणारे लक्ष्मण सवदी म्हणाले की, राजकारणात माणसासाठी दूरदृष्टी आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. राजकारणात कोणीही साधू नसतो, प्रत्येकाला मंत्री व्हायचे असते, नंतर उपमुख्यमंत्री व्हायचे असते आणि त्यानंतर मुख्यमंत्री व्हायचे असते. प्रत्येकाची अपेक्षा असते अन आकांक्षांना अंत नसतो, हीच माणसाची नैसर्गिक मानसिकता आहे, असे ते म्हणाले.
सिद्धरामय्या केवळ अडीच वर्षेच मुख्यमंत्री राहणार असल्याच्या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना, तुम्ही याबाबत सिद्धरामय्या यांनाच विचारले पाहिजे असे ते म्हणाले. त्यांच्यात आणि हायकमांडमध्ये कोणत्या प्रकारची चर्चा झाली हे मला माहीत नाही. त्या चार भिंतींमध्ये झाल्या आहेत असे दिसते. सिद्धरामय्या आणि पक्षाच्या नेत्यांमधील चर्चा उघड झालेली नाही. बाहेर फक्त अटकळी आहेत. काँग्रेसच्या गॅरंटी योजनांबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजप या प्रकरणी संभ्रम निर्माण करत आहे, आधी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करू द्या, मग गाईडलाईन येईल. काँग्रेस सरकार हमी योजना राबवेल यात शंका नाही.
एकंदर, मी निराश नाही, अच्छे दिन येणार आहेत असा विश्वास लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केलाय


Recent Comments