काम पूर्ण होऊनही थकीत बीले न देता दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत उत्तर कर्नाटक कंत्राटदार संघटनेच्या सदस्यांनी धारवाड येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे काम पूर्ण झाले असले तरी, विभागाच्या अधिकाऱ्यांनी थकबाकी पैसे ठेवले आहेत, असे सांगत ठेकेदारांनी त्यांच्यासमोर सर.एम.विश्वेश्वरैय्या यांचे चित्र लावून धरणे आंदोलन केले.
अनेक कामे पूर्ण झाली असली तरी त्यांची थकीत बसले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ठेकेदारांची चांगलीच कोंडी झाली असून, शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ सूचित करून थकीत वेतन जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली.


Recent Comments