शेतातील घराला रात्री अचानक आग लागून वासरू होरपळून दंगल तर गाय आणि शेतकरी जखमी झाला. ही घटना खानापूर तालुक्यातील अवरोळी गावात घडली.

होय, बुधवारी मध्यरात्री अवरोळीत शेतातील घराला आग लागल्याने एकच हलकल्लोळ माजला. या आगीत गोठ्यातील वासरू होरपळून ठार झाले तर गाय आणि जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात असलेला शेतकरी जखमी झाला. नवरत्न जोलद असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने जनावरांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र आगीच्या भडक्यामुळे वासराचा मृत्यू झाला. यावेळी घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नंदगड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


Recent Comments