Bagalkot

हुनगुंदमधील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांचे हाल; सांडपाण्यामुळे शिक्षणाला ग्रहण

Share

बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद शहरातील सरकारी शाळेची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. शाळेच्या मुख्य आवारात पावसाचे आणि सांडपाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शाळेच्या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात जाण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे मुले घसरून पडण्याची भीती आहे, तर शाळेतील उघडी गटारे लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहेत.

शाळेच्या या दुरावस्थेकडे शिक्षकांनी अनेकदा स्थानिक अधिकाऱ्यांना पत्र देऊन लक्ष वेधले आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास घाबरत आहेत. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Tags: